नांदेड

वीज कनेक्शन न तोडता सवलतीच्या दरात थकबाकी वसूल करा:माजी मंत्री डी.पी.सावंत

नांदेड,बातमी24:-या वर्षी नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी वाढली आहे. वेगवेगळ्या सिंचनाच्या माध्यमातून शेतकरी रब्बी पिके घेण्याच्या तयारीत असताना जुनी वीज बील वसुली करण्यासाठी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत. ही बाब शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारे असून थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन न तोडता सवलतीच्या दरात त्यांच्याकडील थकबाकी वसूल करावी अशी मागणी पालकमंत्री अशोकराव चव्हाण व ऊर्जामंत्री नितिन राऊत यांच्याकडे माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या जिल्हयामध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेती पंपाचे वीज बील भरले नाही त्यांचे वीज कनेक्शन तोडण्याचे काम सुरु आहे. या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उपलब्ध असलेल्या पाण्याचा उपयोग करुन रब्बी पिकांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक फायदा मिळू शकतो. परंतु अशावेळी केवळ थकबाकीचे कारण देऊन त्यांचे वीज कनेक्शन तोडल्या जात आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी रब्बीचे पीक घेऊ शकणार नाही.
यावर उपाय म्हणून आज जी प्रचलित वीज आकारणी तीन एचपीसाठी 5 हजार, 5 एचपीसाठी 7 हजार 500 तर 7.5 एचपीसाठी 10 हजार अशी आहे. रब्बी पिकांचे उत्पन्न लक्षात घेतले तरी ही थकबाकीची रक्कम शेतकऱ्यांना भरणे शक्य नाही.त्यासाठी सवलतीच्या दरातील प्रति एचपी 700 रुपये प्रमाणे बिलाची आकारणी करुन शेतकऱ्यांचे तोडलेले कनेक्शन तात्काळ जोडण्यात यावे अशी आग्रही मागणी माजी पालकमंत्री डी.पी.सावंत यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण व ऊर्जामंत्री नितिन राऊत यांच्याकडे केली आहे.

जयपाल वाघमारे - संपादक

Recent Posts

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा…

5 days ago

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष…

2 weeks ago

जिल्हयात अतिवृष्टीमुळे २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित;९३ पैकी ४५ मंडळात अतिवृष्टी

नांदेड,बातमी24 : गेल्या 48 तासांपासून नांदेड जिल्ह्यावर आभाळ कोसळले असून रविवारी जिल्ह्याच्या 93 पैकी 45…

2 weeks ago

शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तक्रार 72 तासांच्या आत करावी:- जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे.…

3 weeks ago

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, ही वार्ता दि.26 सोमवारी सकाळी धडकली.त्याच्यावर…

4 weeks ago