13 ते 15 आगस्ट दरम्यान हर घर झेंडा फडकणार:-जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांची माहिती

नांदेड

नांदेड,बातमी24:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या सूचनेनुसार 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान जिह्यातील सर्व घरांवर तिरंगा झेंडा फडकणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे सोमवार दि.18 रोजी ते बोलत होते.यावेळी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे,मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.तुबाकले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना डॉ.इटनकर म्हणाले,की केंद्र सरकार व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने घर तिथे तिरंगा ध्वज लावण्याच्या सूचना असून या अभियानाची प्रशासनाकडून तयारी सोबतच वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. त्या अनुषंगाने साडे सात लाख झेंडे आवश्यकता असून जिल्ह्यात साडे सात कुटूंबसंख्या असून यात नांदेड शहरात दीड लाख। ग्रामीण भागात साडे पाच लाख घरे आहेत.

जिल्ह्यात 50 हजार कर्मचारी असून एक कर्मचारी या प्रमाणे 150 लाख झेंडे हे प्रशासन खरेडी करून वंचित कुटूंबाला दिली जाणार आहेत,त्याचसोबत काही व्यवसायिक मंडळी सुद्धा झेंडे खरेडी करून देणार आहेत,तसेच छोटे-मोठे व्यापारी,दुकानदार सोबतच रास्त धान्य दुकान येथे सुद्धा झेंडे विकायला ठेवले जाणार असल्याचे डॉ.इटनकर यांनी सांगितले.