सीईओ वर्षा ठाकूर यांनी दिली विभाग प्रमुखांना स्वच्छता राखण्याची तंबी

नांदेड

 

नांदेड, बातमी24:- जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झालेल्या वर्षा ठाकूर यांनी जिल्हा परिषदमधील स्वच्छता व विभागवार अभिलेखे नीटनेटकेपणा ठेवण्याची ताकीद विभागप्रमुखान दिली,त्यामुळे जिल्हा परिषदेत दसरापूर्व स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला आहे.

वर्षा ठाकूर यांनी जिल्हा परिषद विभागवार यांनी भेट देऊन पाहणी केली असता,आस्थावेस्थ पडलेल्या संचिका,गुटखा खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या हे दृश्य पाहून तीव्र व्यक्त केली होती.

या संबंधाने वर्षा ठाकूर यांनी विभाग प्रमुखांची बैठकीत विभागवार स्वच्छता राखण्याविषयी अधिकाऱ्यांना ताकीद दिली.

सीईओ ठाकूर यांच्या आदेशाची अमलबजावणी करत प्रत्येक विभागातील स्वच्छता मोहीम सुरू केली आहे.