नांदेड

नांदेड, बातमी24:-नांदेड उत्तर जिल्ह्याच्या वतीने सर्व तालुक्यातील तहसील कार्यालय व नांदेड शहराच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोल यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याचे षडयंत्र सुरू असून यामध्ये सर्वात जास्त नुकसान गरीब शेतकऱ्याचे होणार आहे. कारण शेती संदर्भात केंद्र सरकारने तीन कायदे पारीत केले आहेत. ते जाचक आहेत. शेतकरी हिताचे नाहीत या नवीन तीन कायद्यास वंचित बहुजन आघाडीचा विरोध आहे. या तीन कृषी विरोधी कायद्या मुळे शेतकरी भूमिहीन भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. वंचित बहुजन आघाडी या विरुद्ध अनेक दशकापासून लढत आहे.
सदरील कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभाव खरेदी करण्याची मुभा कंपन्यांना मिळेल व हमीभावची व्यवस्था संपुष्टात येईल. त्याचप्रमाणे व्यापारी व कंपन्याना साठेबाजी करण्याची काय देखील भुमा मिळेल. हे जाचक कायदे आहेत. ते शेतकरी हिताचे नाहीत. ह्या नवीन कायद्यास वंचित बहुजन आघाडी चा विरोध आहे. शेतकरी विरोधी कायदा परत घ्यावा. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड जिल्हातील नांदेड शहर, अर्धापुर तालुका, हदगाव तालुका, भोकर तालुका, मुदखेड तालुका, किनवट तालुका, माहूर तालुका, हिमायतनगर तालुका तहसील कार्यालयासमोर सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत धरणे आंदोलन चालणार आहे.
शेतकऱ्याच्या विरोधात केलेल्या काळा कायदा रद्द करावा या मागणीसाठी 27 जानेवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन केले होते. या आंदोलनाचा हा दुसरा टप्पा आहे. नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर समोर व जिल्हाधिकारी कार्यालय समोर शुक्रवारी, 5 मार्च रोजी सकाळी 11 वाजता वंचित बहुजन आघाडीच्या सर्व तालुका व शहर अध्यक्षांनी कार्यकर्त्याचे उपस्थित रहावे. असे आवाहन नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धकात म्हटले केले आहे.