पुलाखाली पाणी साचल्याने गाडी गेली पाण्यात

नांदेड

नांदेड, बातमी24ः- नांदेड तालुक्याती सर्व मंडळात रात्रीतून अतिवृष्टी झाली,असून तालुक्यात 77 मिलीमिटरपेक्षा अधिक पाऊस नोंदला गेला आहे. या पावसामुळे हिंगोली गेट खालील रेल्वेपुलाखाली पाणी पातळी वाढल्याने एका चारचाकी वाहन पाण्याखाली गेले आहे. प्रत्येक पावसाळ्यात या पुलाखाली पाणी साचत राहते. महापालिकेकडून कधीच या पुलाच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने बघितले जात नसल्याचा आरोप नगरसेवक बापूराव गजभारे यांनी केला आहे.

प्रत्येक वर्षी हिंगोली गेटच्या पुलाखाली मोठया प्रमाणावर पाणी साचत असते.पाणी वाढले, की या पुलाखालील वाहतुक बंद करावी लागते. पुलाखालील पाण्याचा निचर्‍याबाबत महापालिकेला ठोस असे काम करता आले नाही. थातूर-मातूर काम करून तात्पुरता प्रश्न मिटविण्याचा बाष्कळपणा केला जातो. यामुळे या भागातील नागरिक संतापून जातात.

रात्रीतून झालेल्या पावसामुळे पुलाखाली पाणी साचल्याचा अंदाज बाहेर गावावरून गाडी घेऊन जाणार्‍या चालकास आला नाही. गाडी अर्ध्यापेक्षा अधिक पाण्यात गेली. पुढील धोका पाहून वाहनचालकाने गाडीमधील माणसांना बाहेर काढले. अन्यथा मोठा संभवला असता. या पुलाच्या पाण्याचा कायमचा प्रश्न मिटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मागच्या अनेक वर्षांपासून या पुलाच्या दुरुस्तीची मागणी करत आहे.परंतु मनपा प्रशासनाला जाग येत नसल्याचे बापुराव गजभारे यांनी सांगितले.