चैतन्य बापू देशमुख यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

राजकारण

 

नांदेड,बातमी24:-अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले,असून या संदर्भाने सरकारला नुकसान भरपाई देण्यासाठी भाग पाडावे, या मागण्याचे निवेदन भाजप कार्यकारणी सदस्य चैतन्य बापू देशमुख यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट भेट घेवून मागण्याचे निवेदन दिले.

राज्यात परतीच्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. खरीप हंगाम पुरता हातून गेला. शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी तचैतन्य बापू देशमुख यांनी नांदेड जिल्ह्यातील पीक परिस्थिती संबंधी माहिती देत निवेदन सादर केले. या बाबत राज्य सरकारपर्यंत नुकसानीची माहिती वळविण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी चैतन्य बापू देशमुख यांना दिले.