प्रेमीयुगलांनी संपविली जीवनयात्रा

ताज्या बातम्या

बिलोली, बातमी23-बिलोली तालुक्यातील केरूर येथील विवाहित तरूणी आणि किनाळा येथील तरूणाने देगलूर तालुक्यातील वझरगा येथील मन्याड नदीपात्रामध्ये उडी घेऊन जीवयात्रा संपविली.ही घटना मंगळवार दि. 23 जून रोजी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बिलोली तालुक्यातील केरूर येथील विवाहित भाग्यश्री पिराजी चिमणापुरे (वय.19 वर्षे.) हिचे विवाहपूर्व संबंध किनाळा येथील तरूण प्रविण त्र्यंबक कौठकर (वय.21 वर्षे) याच्याशी होते. मागच्या महिन्यात या विवाहितेचा विवाह दि.29जून रोजी धर्माबाद तालुक्यातील चोंडी येथील तरूणासोबत झाला होता. सदरच्या विवाह त्या विवाहितेचा विरोध होता.

मयत विवाहित भाग्यश्री व तिचा प्रियकार प्रवीण याने
पलायन करून देगलूर तालुक्यातील वझरगा येथील मन्याड नदीपात्रात एकमेकांना ड्रेसच्या ओढणीने घट्ट बांधून दुपारी एक वाजेच्या सुमारास नदीपात्रामध्ये उडी मारली.या घटनेची माहिती होताच नदीपात्रा भोवती लोकांनी गर्दी केली होती.

इच्छेविरुद्ध हा विवाह करण्यात आल्याने मयत भाग्यश्री सासर येथून माहेरी जाते म्हणून दि.22जून च्या मध्यरात्री घरातून निघून आपल्या प्रियकरासोबत पलायन केले.आपण एकमेकांपासून दुरावलो, अशी भावना मनात त्यांच्या निर्माण झाली. त्यामुळे दि.23 जून रोजी नदी पात्रामध्ये उडी मारून आत्महत्या केली.

मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी नायगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.मयत मुलीचे वडील मरीबा चिमनापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा आकस्मिक मूत्युची नोंद करण्यात आली.