पहिल्याच बैठकीत अधिकाऱ्यांचे धाब्बे दणाणले;सीईओ स्पष्ट केली भूमिका

नांदेड

जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्हा परिषदेत नुकत्याच रुजू झालेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी कार्यालयीन कामकाजाच्या निमित्ताने आपली भूमिका स्पष्ट करत अधिकाऱ्यांनी नियमन पाळून कामे करावे,अन्यथा त्या इशारा देण्यास विसरल्या नाहीत.त्यामुळे विभागप्रमुखांच्या पहिल्याच बैठकीत अधिकाऱ्यांचे धाब्बे दणाणल्याची चर्चा सोमवारी जिल्हा परिषदेत होती.

जिल्हा परिषद सीईओ राहिलेल्या वर्षा ठाकूर-घुगे यांची लातूर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली.त्यांच्या बदलीच्या जागी नंदुरबार आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा सहायय जिल्हाधिकारी मीनल करनवाल या जिल्हा परिषद सीईओ म्हणून रुजू झाल्या आहेत.सोमवारी त्यांनी विभाग प्रमुखांची बैठक घेतली.

या बैठकीत त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना संबोधित करताना कामे करत असताना होणाऱ्या चुका ग्राह्य धरू शकते.चूक दुरुस्त करून कामे करा,लोकांपर्यंत आपण पोहचलो पाहिजे,कामे अडगळीत पडता कामा नये,अशी स्पष्ट ताकीद देत त्यांनी माझ्यापासून लपविण्याचा किंवा खोट बोलण्याचा प्रयत्न केला,तर अजिबात खपवून घेतले जाणार नाही.यात बिलकुल क्षमा केली जाणार नाही,मला खोटं बोलणं सहन होत नाही.

त्यामुळे विभागप्रमुखांनी प्रामाणिकपणे कामे करण्याचा प्रयत्न करावा,आणि जिल्हा परिषद लौकिक मिळवावा असे सीईओ श्रीमती करनवाल बैठकीत सांगितले. या बैठकीनंतर अधिकाऱ्यांचे धाब्बे दणाणल्याची चर्चा होती.तर काही विभाग प्रमुख यांनी सीईओ करनवाल यांच्या भूमिकेचे स्वागत केले.यावरून सोमवारी जिल्हा परिषदेत खमंग चर्चा रंगली होती.