जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांच्या आदेशाने दिलासा

नांदेड

 

नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू घटू लागली आहे,यात विशेषतः नांदेड जिल्ह्यातील रुग्णसंख्या दहा टक्यांपेक्षा कमी झाली आहे.त्यामुळे नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी टाळेबंदीशी संबंधीत दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.व्यापाऱ्यांना सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत दुकाने घडता येणार आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काळ राज्याला उद्देशून संवाद साधला.यावेळी वीस टक्केपेक्षा जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यात निरबन्ध कायम ठेवावे,मात्र दहा टक्के पेक्षा कमी रुग्ण संख्या असणाऱ्या जिल्ह्यातीळ नियम हे शिथिल करवव,असे आदेश देण्यात आले.त्यानुसार नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी टाळेबंदीचे आदेशात काही अंशी शिथिलता आणली आहे.

यामध्ये सर्व अत्या आवश्यक सेवा व वस्तू दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने उघडता येणार आहेत.सर्व शासकीय कार्यालये ही 25 टक्के कर्मचारी या प्रमाणे भरविली जातील,कृषी क्षेत्राशी संबंधित दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यँत सुरू राहतील,असे आदेशात नमूद करण्यात आले.