शासनाच्या योजनांची जनजागृती गावो-गावी करा:-पालकमंत्री अशोक चव्हाण

कृषी

 

नांदेड,बातमी24:-राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती गावो-गावी जाऊन केल्यास नागरिकांना यातून माहिती मिळणे सोयीचे ठरेल,त्यासाठी प्रशासनाने जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले,ते नांदेड जिल्हा परिषदच्या वतीने आयोजित पशु रुग्णालय फिरत्या रथाचे उदघाटन प्रसंगी बोलत होते.

कोविडची परिस्थिती लक्षात घेता शासनाच्या विविध निकषाचे पालन करुन जिल्हा परिषदेच्या प्रागंणात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमरनाथ राजुरकर, जवळगावकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार बालाजी कल्‍याणकर, आमदार शामसुंदर शिंदे,जिल्हाधिकारी विपीन ईटनकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्‍हा परिषद उपाध्‍यक्षा तथा आरोग्‍य सभापती पदमा सतपलवार, कृषी व पशुसंवर्धन सभापती बालासाहेब कदम रावणगावकर, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, समाजकल्‍याण सभापती रामराव नाईक, महिला व बालकल्‍याण सभापती सुशिलाबाई पाटील बेटमोगरेकर, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी इतर पदाधिकारी व पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थिती होती.

यावेळी बोलताना पालकमंत्री चव्हाण म्हणाले,की पशुधनावर उपचार करणे हे पुण्याचे काम आहे.पशुधनाचे विविध साथीच्या आजारातून मुक्तता झाली पाहिजे, ग्रामीण भागात वैधकीय सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे,यासाठी मुखमंत्री पशु स्वास्थ योजना सुरू करण्यात आली आहे, आज घडीला मोजके तालुके असले,तरी पुढील काळात सर्व तालुक्यासाठी फिरते वाहन उपलब्ध करून दिले जाईल,अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.

प्रत्येक गावात समशानभूमी उभारली जाणार या कामास प्राधान्य देण्यात आले आहे.बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत बाल विवाह रोखणे,त्यासाठी प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजना स्तुत्य असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. जिल्हा परिषद अंतर्गत शासनाच्या योजनांचा पाठपुरावा करताना लोकांना माहिती देणे आवश्यक आहे.असे उपक्रम मर्यादित न राहता गावपातळीवर घेऊन जाणे आवश्यक,त्यासाठी जनजागृतीवर भर द्या असे चव्हाण यांनी सांगितले.