भीषण अपघातात वंचीतचे लातूर जिल्हाध्यक्षासह तीन जण ठार एक जखमी; गेवराई जवळील घटना

ताज्या बातम्या

 

बीड,बातमी24:- कौटूंबिक कामानिमित्त औरंगाबाद येथे जाणारे चार चाकी वाहन डिझेलच्या कंटेनर गाडीवर जाऊन आदळले,या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. मयतामध्ये वंचीत बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष यांच्या तिघांचा समावेश आहे.हा अपघात बीड जिल्ह्यातील गेवराई जवळ गुरुवार दि.26 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास झाला.

वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे व नातेवाईक संतोष भिंगे,राम भिंगे,सुभाष भिंगे व अन्य एक सहकारी असे पाच जण हे एम.एच.46-बी.9700 या गाडीत बसून औरंगाबादच्या दिशेने जात होते. गाडी गेवराई जवळ गेली,असता कंटेनवरवर जाऊन आदळली.

भीषण अपघातात सदाशिव भिंगे,संतोष भिंगे, राम भिंगे व सुभाष भिंगे यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघाताची माहिती कळताच लातूर जिल्ह्यावर शोककळा पसरली, लातूर जिल्ह्यातील वंचीत बहुजन आघाडीचा तरुण जिल्हाध्यक्ष अपघाती मरण पावल्याने मराठवाड्यातील कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे.