शासनाने पाय उतार केले,तरी बारगळ यांना खुर्ची सुटेना

नांदेड

नांदेड,बातमी24:- पदाचा अतिरेक करणाऱ्या जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातील प्रभारी कार्यकारी अभियंता श्री.बारगळ यांची शासनाने हकालपट्टी केली असली,तरी अद्याप त्यांनी चार्ज सोडला नसून खुर्चीला चिटकून असल्याची चर्चा सुरू आहे.

देगलूर येथील पाणी पुरवठा विभागात उपअभियंता असलेल्या बारगळ यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा पदभार देण्यात आला होता.या काळात आर्थिक लाभाचे कामे प्राधान्याने हाताळता असताना स्वतःची न होणारी कामे सुद्धा करून घेतली होती.मात्र लोकप्रतिनिधींना अरेरावी व उद्धट वर्तणुकीचे दर्शन ही घडवित होते.त्यामुळे त्यांच्याबद्दल मोठा रोष होता.

बारगळ हटाव यासाठी लोकप्रतिनिधीनी आवाज उठविला होता. यापूर्वी राज्यमंत्री बनसोडे, व मंत्री गुलाब पाटील यांच्या पत्रावर बारगळ यांचा पदभार काढुन घेण्यात यावी,म्हणून स्वाक्षरीचे पत्र ही आले होते.मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेतली नव्हती,मात्र शासनाने जीवन प्राधिकरण बावसकर यांचे पदभार देण्याचे आदेश दिले आहे.