जिल्ह्यातील मराठा नेत्यांवर अन्याय का केला? फारुक अहमद यांचा चव्हाण यांना सवाल

नांदेड

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यातील राजकारणात मूळ नांदेडकर मराठा नेते स्वकर्तृत्व व स्वकष्टाने पुढे आले होते व आपआपल्या पद्धतीने राजकारणात सक्रिय होते. तत्कालीन नेत्यांची सामाजिक बांधिलकी अशोक चव्हाणांपेक्षा चांगली होती. आपआपल्या परीने त्या मराठा कुटुंबियांनी गरीब-श्रीमंत असा भेदभाव निर्माण न होऊ देता राजकारण केले होते.

त्यात शामराव कदम, जयंतराव पाटील वायपनेकर, गंगाधरराव कुंटूरकर, साहेबराव बारडकर, आष्टीकर, खतगावकर, गोरठेकर, तरोडेकर, किन्हाळकर, भाऊराव पाटील धनेगांवकर यांना राजकीय द्वेषातून बाजूला केले आणि मूळ नांदेडशी काहीही संबंध नसलेल्यांना खर्‍या मराठा नेत्यांच्या उरावर बसवले. ही गरीब- श्रीमंत मराठ्यांमध्ये अशोक चव्हाणांनी जाणीवपूर्वक फूट पाडली असल्याचा आरोप फ ारुक अहेमद यांनी केला.

महाराष्ट्रातील सर्वाधीक आत्महत्या झालेल्या जिल्ह्यांमध्ये बीड नंतर नांदेडचा नंबर लागतो यातूनच चार दा मुख्यमंत्रीपद लाभलेले घराण्याचे श्रीमंत राजकुमाराने छोट्या शेतक-यांचकडे पाठ फिरवून आपले कारखाने चालवण्यावर भर दिले या पेक्षा गरीब-श्रीमंत फुटीचे काय वेगळे उदाहरण द्यावे? याचे उत्तर चव्हाण यांनी आधी द्यावे आणि नंतरच बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर बोलावे असे प्रत्युत्तर वंचितचे नेते फारूक अहमद यांनी दिले