सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात नाहक ‘हत्ती’च बळ आणू पाहणाऱ्यांना आनंदराज आंबेडकर यांची चपराक

महाराष्ट्र

मुंबई,बातमी24:-महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या लोकहिताच्या सर्व योजनांचा लाभ समाजातील सर्वच घटकांना मिळाला पाहिजे यासाठी सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी अधिकारी काम करत आहे परंतु अशा सर्व कर्मचारी अधिकारी यांना विविध कारण घेऊन काही राजकीय लोक या लोकांची गळचेपी करून त्यांची नाहक बदनामी तसेच त्रास देण्याचे काम करत आहे.अशा बदनामी करणाऱ्या राजकीय लोकांमध्ये समाजकल्याणमुळेच ‘हत्ती’चे बळ आले,असून बोगस हत्तीचे बळ घेऊन वावरणाऱ्या लोकांना रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी चांगलेच फटकारत समाजकल्याणच्या अधिकारी व कर्मचारी यांनी हत्तीचे बळ देऊन चांगले काम करण्यास प्रोत्साहन दिले आहे.

समाज हिताच्या योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी समाज कल्याण विभागातील अधिकारी कर्मचारी यांना बळ देण्यासाठी सर्व आंबेडकरी जनता या विभागाच्या सर्व कर्मचारी , अधिकारी यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आणि आंबेडकरी जनतेला आवाहन करण्यात येते की सर्व सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग च्या कर्मचाऱ्यांना बहुजनांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करावे.अशा अधिकारी कर्मचारी यांना एकप्रकारे आनंदराज आंबेडकर यांनी हत्तीचे बळ देत स्वतःच्या स्वार्थासाठी समाजकल्याणमधील अधिकारी यांना वेठीस धरणाऱ्यांचे हत्तीचे बळ शिण करून टाकल्याचे बोलले जात आहे.