महसूल मंत्र्यांकडून नांदेडच्या कार्याचे कौतुक

महाराष्ट्र

जयपाल वाघमारे

नांदेड, बातमी24:- सध्या सगळीकडे कोरोनाने थैमान घातले,असून हजारो लोक बाधित होत आहे, ऑक्सिजन,इंजेक्शन व बेड तुटवडा असताना नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे, हे कार्य नक्कीच प्रशंसनीय असून पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी टीमचे अभिनंदन करावे तितके कमी असल्याचे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

राजीव सातव यांच्या अंत्यविधीसाठी ते कळमनुरी येथे जाण्यासाठी नांदेडला काँग्रेसचे सर्व मंत्री व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे शासकीय विश्रामगृह येथे होते.यावेळी थोरात यांनी विविध विषयांवर संवाद साधला.यावेळी बोलताना ते म्हणाले,की नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या भरमसाठ होती. सोबतच मृत्यू दर वाढलेला असताना,अशा परिस्थितीत नांदेड जिल्ह्यात ऑक्सिजन तुटवडा जाणवला नाही.आता तर रुग्ण संख्या दोनशे ते तिनशेच्या आत आली आहे.तसेच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. ही आकडेवारी पाहता नांदेडचे कोरोना नियंत्रणाचे प्रयत्न कौतुक करावे असे असल्याचे त्यांनी सांगितले.

याचसोबत थोरात यांनी कोरोनाच्या संसर्गामुळे राज्याच्या तिजोरीवर परिणाम झाला,असून केंद्र सरकार जीएसटीचा परतावा देत नाही,त्यामुळे राज्याला पगारी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी 60 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढावे लागल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या संदर्भाने भाजप शासित राज्यांपेक्षा महाराष्ट्र परिस्थिती चांगली आहे, गुजरातमधील मृत्यू आकडे आणि उत्तर प्रदेशमधील लोकांचे मृत्यू गंगेच्या रूपाने पुढे आलेत. जगात विश्व गुरू म्हणून घ्यायचे आणि देशातील कोरोनाचे हाल यावर बोलायचे नाही,त्यामुळे मोदी यांची जागतिक पातळीवर प्रतिमा मलिन झाल्याची टीका थोरात यांनी केली.मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीस यांनी वैचारिक सभयता राखली पाहीजे,असा सल्ला यावेळी थोरात यांनी दिला.
——–
दोन भावंडातील भांडण

महसूल आयुक्त कार्यालयबाबत लातूर व नांदेड हा वाद दोन भावंडातील वाद आहे, त्यामुळे या वादात पाहुण्यांनी पडण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत या वादाच्या विषयाला थोरात यांनी बगल देण्याचा प्रयत्न केला.